Land Record Maharashtra : मित्रांनो, आपल्याला वडिलोपार्जित मिळालेली जमीन आपल्या नावावर करताना किंवा एखादी प्रॉपर्टी (Property) किंवा संपत्ती तुमच्या नावावर करण्यासाठी किती खर्च येतो? तुम्हाला तर माहीतच असेल. बहुतांश शेतकरी खेड्यापाड्यातील असल्यामुळे जमीन नावावरती करताना (Land Transfer) त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळली जाते.
📢 यासंदर्भातील शासन निर्णय येथे पहा !
या सर्व बाबीचा विचार करून शासनाकडून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याअंतर्गत वडिलोपार्जित जमीन आपल्या नावावर फक्त 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करता येणार आहे;
जमीन 100 रु. मध्ये नावावर करा
म्हणजेच जमीन आपल्या नावावर करण्यासाठी फक्त आपल्याला 100 रुपये लागणार आहेत. त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया काय आहे? अर्ज कसा करावा? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
सध्यास्थितीमध्ये जमीन (Land Record) नावावर करणे म्हणजे एखादी लढाई खेळण्यासारखीच आहे जणू. कारण जमिन नावावर करताना अनेक अडचणी समोर येतात त्याचप्रमाणे ही संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ असल्याने आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर मध्यस्थी व्यक्तींकडून पैसे घेतले जात असल्याकारणाने या गोष्टीकडे शेतकरी दुर्लक्ष करतात; परिणामी ही प्रक्रिया किचकट होते त्यानंतर विपरीत परिणाम आपल्या संपत्ती किंवा जमिनीवर होतात.
Land Record बद्दलचा जुना शासन कायदा काय सांगतो ?
जमीन नावावर करण्यासंदर्भातील जर तुम्ही जुना शासन निर्णय किंवा कायदा पाहिला, तर त्याठिकाणी तुम्हाला वडिलोपार्जित जमीन कुटुंबातील मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर करण्यासाठी जमिनीच्या बाजारभावानुसार मुद्रांक शुल्क शासनाला द्यावा लागत असत. परंतु एखाद्या गरीब शेतकऱ्याला ही रक्कम परवडण्याजोगी नव्हती; त्यामुळे शासनाकडून यामध्ये बदल करून नवीन निर्णयानुसार फक्त 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
📢 यासंदर्भातील शासन निर्णय येथे पहा !
अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करून माहिती मिळवा
शंभर रुपयाच्या स्टॅम्पपेपरवर आपण आपल्या संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकतो आणि वडिलोपार्जित (Ancestral Land) मयत व्यक्तीच्या नावावरील जमीन वारसदार म्हणून आपल्या स्वतःच्या नावाने किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने करू शकतो.
📢 कामगारांना मिळणार १०,००० रु. :- येथे पहा
📢 शेतकऱ्यांना वार्षिक ७५ हजार रु. मिळणार :- येथे पहा